शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसला संपविणारेच एक दिवस संपतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:38 IST

वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत ...

वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत नाहीत. उलट घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, ही खेदाची बाब आहे. ज्या काँग्रेसने अतुलनीय त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ती संपविण्याची भाषा करणारेच एक दिवस संपून जातील. पंडित नेहरू, महात्मा गांधी, किसन वीर यांच्या समाजवादी विचारांची माहिती आज तरुण पिढीला होणे गरजेचे आहे,’ असे उद्गार माजी केंद्र्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.वाई येथे आयोजित कार्यक्रमास डॉ. शैलेंद्र वीर संपादित क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी उद्योग राज्यमंत्री विनायक पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पतंगराव फाळके, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, कवठेचे सरपंच श्रीकांत वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिंदे पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा, सांगली जिल्हा स्वातंत्र्यवीर घडविणारी फॅक्टरी होते. प्रतीसरकार स्थापन करून इंग्रजांना आव्हान देणारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनच देशात ओळखला जातो. स्वातंत्र्याचा इतिहासही अलीकडच्या काळातील पिढी विसरायला लागली आहे. त्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे अजूनही संशोधन होणे गरजेचे आहे. आबांचे चरित्र नेहमीच नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करीत राहील. डॉ. शैलेश वीर यांनी द्वितीय आवृत्ती काढून मोठे काम केले आहे.’यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी मनोगतात आबासाहेब वीर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. प्रास्ताविकात डॉ. शैलेंद्र वीर यांनी आबासाहेब वीर यांचा लहानपणापासूनचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडून आबांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेंद्र वीर, अ‍ॅड. संजय खडसरे, अल्पना यादव, सुनील करडे यांनी स्वागत केले. डॉ. जितेंद्र्र वीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजया भोसले, मोहनआबा भोसले, शंकरराव पवार, डॉ. जे. बी. जमदाडे, नामदेवराव शिंदे, बापूसाहेब शिंदे, संदीप पोळ, अरुण पवार, प्रताप देशमुख, केशवराव पाडळे, विजयसिंह नायकवडी, आनंदराव लोळे, प्रदीप जायगुडे, विजया वीर आदींसह नागरिकउपस्थित होते.